
Tej Police Times
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आले आहे. उद्या विधानसभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षण थांबवले जाईल, हे आपल्याला मान्य आहे का? असा सवाल उपस्थिता करत ‘मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
सदाभाऊ खोत यांनी पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामागे षडयंत्र, बोलवता धनी दुसराच? हर्षवर्धन पाटलांचे मोठे विधान
‘जरांगे पाटील आणि शरद पवार यांची जी घोषणा आहे, २०० आमदार विधानसभेत असतील. याच्याच अंमलबजावणीला आता सुरुवात केली आहे. मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिले पाहिजे, असा त्यांचा निर्णय झाला आहे. आता ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी वंचितच्या उमेदवारांना मत देण्याची भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका जर बजावली तरच ओबीसींचे उमेदवार निवडून येतील, असे आंबेडकर यांनी अधोरेखित केले.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक प्रचारावरही सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, एक प्रचार निश्चित केला जाणार की, धर्म संकटात आहे. पण मी तमाम ओबीसींना विचारतो की, आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का ? तो आपण मुघलांच्या काळात सोडला नाही, तर आताच्या काळात कसा सोडणार? ही चर्चा निरर्थक आहे. ही चर्चा भाजप, आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा यांच्यामार्फत केली जाते. पण तुम्ही त्यांना विचारा की, तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूने का नाही. ओबीसी आरक्षणाचे समर्थन आपण का करत नाही. धोका धर्माला नसून आरक्षणाला आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.