
Tej Police Times
अक्कलकुवा हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ आहे. यात अक्कलकुवा व अक्रानी हे दोन तालुके येतात मतदारसंघ येतात. यात एकूण ३ लाख १२ हजार ३७० मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेस तर्फे माजी मंत्री तथा आमदार के. सी. पाडवी हे सलग सातवेळा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. यंदाही काँग्रेसकडून पुन्हा पाडवी यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये त्यांच्याविरोधात आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी के. सी. पाडवी यांचा २ हजार ९६ मतांनी निसटता विजय झाला होता. यावेळी महायुतीकडून पाडवींविरोधात पुन्हा आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देत या मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याचे ठाणले आहे. त्यासोबतच काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही भारतीय आदिवासी पार्टीतर्फे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अक्कलकुवामध्ये चौरंगी लढत रंगणार आहे.
चारही दिग्गज उमेदवार रिंगणात असल्याने केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे विधानसभा लढतीकडे लक्ष लागून आहे. नुकताच अनेक नागरिकांनी कामाच्या शोधात या प्रदेशातून स्थलांतर केले आहे. त्यामुळे या स्थलांतरीत मतदारांमुळे अनेक उमेदवारांच्या मतांचे गणित बिघडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
अक्कलकुवा मतदारसंघ दोन तालुक्यांना जोडलेला आहे. हा प्रदेश अतिदुर्गम असून अनेक समस्यांनी वेढलेला आहे. या मतदारसंघात येणाऱ्या दोन तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये वेगवेगळ्या नेत्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांमधील नेते ज्याला मदत करतील त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे.
यंदाच्या लोकसभेमध्ये या मतदारसंघात काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. संविधान बदलण्यावरुन असलेला विरोध आणि आरक्षण आदी मुद्द्यांमुळे काँग्रेसला फायदा झालेला दिसला. मात्र विधानसभेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मतदारसंघातील विविध समस्या तसेच झालेला विकास यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधानसभेत स्थानिक मुद्द्यांवर मतदारांनी अधिक भर दिलेला दिसून येत आहे. या भागांत अनेक विकासकाने केली असल्याचा दावा के.सी.पाडवी केला. तर 35 वर्षांत या मतदारसंघात काहीच विकास झाला नसल्याचा आरोप विरोधक उमेदवार करत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील समस्या व विकास यामुद्द्यांवरच येथील निवडणूक अवलंबून असणार आहे. अक्कलकुवा विधानसभेत ॲड. के. सी.पाडवी,आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी खासदार डॉ.हिना गावित यांच्या चौरंगी लढत होणार आहे. मागील निवडणुकांपेक्षा या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.