
Tej Police Times
नागपूर-विदर्भात औद्योगिकरणासाठी आधी प्रयत्न व्हायचे. कारखानदारीसाठी प्रयत्न केले. आता कारखाने येत नाही आणि आल्यास स्थलांतरित केले जातात.
केंद्रातील सत्तारुढ नेत्यांनी फॉक्सकॉन गुजरातमध्ये नेला. एअरबसची निर्मिती नागपुरात येण्याच्या विचारात होते. इथे कारखाना व्हावा, विमाने तयार व्हावी, हजारो तरुणांना रोजगार ही अपेक्षा होती. तो इथे येण्याऐवजी गुजरातला नेला, अशी तोफ पवार यांनी डागली.
Shah Rukh Khan ला जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर पहिल्या क्रमाकांवर असणारे राज्य सहाव्या क्रमांकावर गेले. कायदा सुव्यवस्था ठिक नाही. नागपूर आणि शेजारच्या परिसरातून ६ महिन्यात ६३० महिला गायब झाल्या. घामाची, कष्टाची किंमत दिली नाही, शेतकऱ्यांकडे बघितले नाही, त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली. कास्तकारांची चिंता नाही, महिलांचे संरक्षण नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा निर्धार करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
Sharad Pawar : मला त्या रस्त्याने जायचे नाही, पण तुम्हाला दम दिला तर मला कळवा; शरद पवार आक्रमक, नेमकं घडलं तरी काय?
नागपूर शहर काँग्रेस विचारधारेचे आहे. विदर्भातील मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांनी राज्याची सेवा केली, बळ देण्याचे काम केले. पाच वर्षाच्या सत्तेनंतर निवडणुकीत भाजपला स्वबळावर सत्ता टिकवण्याची संधी आली असताना, यश आले नाही. विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीने दिलेल्या पाच गॅरंटीची अंमलबजावणी केली जाईल. आम्ही जुमलेबाजी करत नाही तर, दिलेला शब्द पाळतो तो पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे, असा शब्द शरद पवार यांनी दिला.
पूर्वमध्ये काँग्रेसची चांगली ताकद आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचे चांगले काम आहे. एक दिलाने लढल्यास आपला विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, अशी ग्वाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. भाजपने लोकशाहीची हत्या केली. राज्यघटना न मानणाऱ्यांविरोधात आपला लढा आहे. लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर होत्या, आता महाराष्ट्रात जनतेचा लढा आहे, असे काँग्रेसचे निरीक्षक व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व विदर्भाचे प्रभारी भूपेश बघेल म्हणाले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, निलेश कराळे आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव रामकिसन ओझा, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे, माजी आमदार अशोक धवड, प्रकाश गजभिये, किशोर गजभिये, राष्ट्रवादीचे नेते ईश्वर बाळबुधे, शेखर सावरबांधे, वेदप्रकाश मिश्रा, नूतन रेवतकर, ओबीसी महासंघाचे शहराध्यक्ष परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते.
Sharad Pawar : ३० वर्ष जबाबदारी, तरी कामं झालं नाही; आता नेतृत्व बदलण्याची गरज, शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा
जातनिहाय जनगणनेनंतर आरक्षणाचे चित्र स्पष्ट होणार आहे. आम्ही तीन वर्षांपासून ही मागणी रेटून धरली आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी
जातनिहाय जनगणना व्हावी, झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत.
Sharad Pawar : भाजपच्या हातात सत्ता गेली आणि राज्य पहिल्यावरुन ६व्या क्रमांकावर, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी नागपुरात संविधान सन्मान संमेलनात जातनिहाय जनगणना करणे आणि आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेची भिंत पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही गुरुवारी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीची भूमिका जातनिहाय गणनेची असल्याचे स्पष्ट केले. जातनिहाय गणनेतून बऱ्याच बाबी समोर येतील. आरक्षणाचे गणित ठरेल, मर्यादा वाढण्याासाठी नवी दिशा मिळेल, असे पवार स्पष्ट केले.
राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. यासाठी वातावरण निर्मिती करून मतदारांचा आत्मविश्वास वाढवावा लागेल, असेही पवार म्हणाले.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.