
Tej Police Times
ठाकरे यांची रत्नागिरी येथील सभा म्हणजे केवळ गद्दार खोके खाऊ आरोप या पलीकडेही सभा नव्हती. सांताक्रुज गोळीबरापासून तुम्ही मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिका तुमच्याकडे असताना आठ आठ दहा वर्ष मराठी वर्ष मुंबईच्या बाहेर का फेकली गेली? त्यांना फक्त एक वर्षाचे भाडं दिलं गेलं त्यांची घरे तोडली गेली पण पुन्हा त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिल्या नाहीत उद्धवजी यामध्ये पार्टनर कोण कोण होते सांगाल का आपण ? असा खडा सवाल रामदासभाई कदम यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही बोटे कुणाकडे दाखवत आहे सांगा उद्धवजी एअरपोर्ट तुम्ही कोणाच्या खिशात घातलात? कशाला दुसऱ्यांकडे बोटे दाखवत आहात त्यामुळे आता मी आपल्याला इतके सांगेन की आता लोकांना फसवण्याचे धंदे थांबवा तुमची सहानुभूती तर निघून गेलीच पण आता खोटं बोल पण रेटून बोल उद्धवजी हे धंदे आता थांबवा असा जाहीर सल्ला देत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
त्यामुळे कृपा करून आता फसवण्याचा थांबवा महाराष्ट्राला ,कोकणाला फसवू नका स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब वर स्वर्गातून बघत आहेत हे तुमचं वागणं बघून खोटं बोलणं बघून त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. उद्धवजी तुम्ही स्वतःला फसवून घेत आहात पण तुम्ही बाळासाहेबांना फसवू शकत नाही. त्यामुळे उद्धवजी इतरांच्या जॅकेट, दाढ्या काढण्यापेक्षा तुमच्या गाड्या कुठून आल्या व कशा आल्या हे तुम्ही लोकांना सांगाल का? जॅकेट, दाढ्या कोणाच्या कशाला काढत आहात साहेब आम्ही इतके वर्षे साथ केली आहे आम्ही बोललो तर तुम्ही अडचणीत याल असा थेट सूचक इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.
अडीच वर्षात तुम्ही मुख्यमंत्री असताना काय केलं हे सांगा गेल्या अनेक वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सव्वा दोनशे लोकाभिमुख निर्णय घेतले ना उद्धवजी मग तुम्ही काय केलं ते सांगा. तुम्ही हे केले ते केले काय केलेत अडीच वर्षात ते सांगा ते तुम्ही बोलत नाही. कोकणात फयानसारखं वादळ आलं तेव्हा कुणीकडे होतात?
शेवटी शरद पवारांना सांगावं लागलं उद्धवजी आता बाहेर पडा कदमांकडून पवारांचे कौतुक
इतकंच नाही तर कोकणात फयान सारखं मोठं वादळ आलं तेव्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखा 84 वर्षांचा गृहस्थ कोकणामध्ये चार दिवस येऊन ठाण मांडले आणि त्या माणसाने कोकणी माणसाचे अश्रू पुसले असं सांगत रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या कौतुक केलं. उद्धवजी पण तुमच अश्रू हे मगरमच्छ आहेत. शेवटी शरद पवार यांना सांगावे लागले की उद्धवजी आता तरी तुम्ही बाहेर पडा असाही गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे आता लोकांना फसवू नका लोकांना सगळं कळतं एकनाथ शिंदे गद्दार नाही आहेत तर बाळासाहेबांचे विचारांशी गद्दारी तुम्ही केले आहात असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला आहे.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.