
Tej Police Times
योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंग तो कटेंगे’वर महायुतीत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्षेप घेतला आहे. हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांचा आहे. राज्याबाहेरचे लोक येऊन असे विचार मांडतात. अन्य राज्यांच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं त्यांना काय बोलायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.
काजू खाल्ले चार, खर्च झाला फार; कॅमेऱ्याची नजर भाजप आमदाराला महागात; प्रचारात भन्नाट किस्सा
महायुती म्हणून सोबत काम करत असलो तरीही आमच्या पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. आम्ही किमान समान कार्यक्रम आखून त्यावर सरकार चालवत आहोत, असं अजित पवारांनी सांगितलं. आम्ही आजही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो. अन्य राज्यांमध्ये अशा घोषणा चालत असतील. महाराष्ट्रात त्या चालणार नाहीत. त्यामुळे भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं त्यांना काय बोलायचं आहे, अशी पुस्ती पवारांनी जोडली.
आणखी एका राज्यात खोक्यांवरुन राडा; CMकडून CID चौकशीचे आदेश, कारण ठरले समोसे; प्रशासनात खळबळ
शिंदेसेनेचे नेते आणि दिंडोशीचे उमेदवार योगी आदित्यनाथ यांनी मात्र योगींच्या घोषणेला पाठिंबा दर्शवला. आपण वेगळे झाल्यावर कमजोर होतो. त्यामुळे एकजूट राखायला हवी. ती राखल्यास मजबूत राहू, असं योगीजी म्हणतात. कदाचित आज ही बाब अजित पवारांना समजत नसेल. पुढे ती त्यांना समजेल, असं संजय निरुपम म्हणाले. ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा नक्कीच काम करेल. अजित दादांना ती समजून घ्यावी लागेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काहीही चुकीचं बोलत नाहीत. काहींनी त्यांचे विचार कळायला वेळ लागू शकतो, असं निरुपम पुढे म्हणाले.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.