
Tej Police Times
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत थोरात यांनी काँग्रेसच्या बंडखोरांबाबत भाष्य केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे या वेळी उपस्थित होते. ‘बंडखोरांचे आव्हान केवळ महाविकास आघाडीपुढे नाही. महायुतीमध्येही अनेक बंडखोर उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याने आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त होती. अनेक अपक्ष उभे करून मतविभाजन करणे, ही भाजपची नेहमीची पद्धत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला बंडखोरांना भाजप आणि महायुतीचे पाठबळ आहे का, याचा शोध घेतला जाईल,’ असे थोरात यांनी स्पष्ट केले.
शहरातील कमल व्यवहारे, आबा बागूल, मनीष आनंद या बंडखोरांवर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जात आणि धर्मावरून ध्रुवीकरण करणे भाजपच्या राजकारणाचा भाग आहे. जनता या प्रकाराला कंटाळली असून, १८० पेक्षा जास्त उमेदवार निवडून देऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हा दुय्यम भाग आहे. भ्रष्ट सरकार घालवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे थोरात यांनी सांगितले.
‘आपण कोणामुळे मोठे झालो याचे ऋण व्यक्त करायचे असते. मला सोनियाजींमुळे मोठी संधी मिळाली,’ अशा शब्दांत थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. निवडणुकीत काँग्रेस किती जागांवर विजयी होईल; तसेच निवडणुकीनंतर मोठा पक्ष कोणता असेल, या प्रश्नावर त्यांनी भाष्य करणे टाळले.
आमच्या योजना बंद होणार नाहीत; Ladki Bahin Yojanaवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं विधान
‘महायुतीमुळे अर्थ खात्याचा बोजवारा’
‘दोन पक्ष फोडून सत्तेत आलेल्या बेकायदेशीर सरकारने अडचणीत सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केलेल्या नेत्याला दोन दिवसांत उपमुख्यमंत्री केले. या सरकारने पक्षांतरबंदी कायद्याची मोडतोड केली आहे. एका आमदाराला पाच-दहा कोटी तर दुसऱ्याला काही निधी नाही, असा दुजाभाव करणाऱ्या वा सरकारने अर्थ खात्याचा बोजवारा उडवला आहे. गरिबांना मदत करण्याच्या योजना काँग्रेसने पूर्वीपासून राबविल्या आहेत. मात्र, या सरकारने लाडक्या बहिणीऐवजी जाहिराती आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर अवाढव्य खर्च करून राज्याला दिवाळखोरीत नेले आहे,’ अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
चाळीस दरोडेखोरांनी पक्ष लुटला; बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांची शिंदे गटावर टीका
राज्यघटनेच्या लाल रंगाच्या पुस्तिकेवरून टीका करणाऱ्यांना राज्यघटना मान्य नाही. घरातील महिला लाल कुंकू लावतात. त्या नक्षलवादी आहेत का? भाजपच्या नेत्यांनी टीका करण्याची पातळी सोडली आहे. त्यांचे वर्तन राज्यघटनेला अनुसरून नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारा भाजप हाच लोकांना बाटवणारा आणि कापणारा आहे. -बाळासाहेब थोरात
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.