
Tej Police Times
निवडणुकीच्या तोंडावर सभांचे सत्र सुरू असताना आदित्य ठाकरे यांची नाशिक मधील सभा जरा ‘हटके’ ठरली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे मंचावरून खाली उतरुन थेट जनतेत गेले.
“भाजप सरकारने २०१४ साली प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होतील असं आश्वासन दिले होते.महायुती सरकारने त्याचे १५०० केले,आणि आता जर पुन्हा महायुती सत्तेत आली तर १५०० वरून १५० रूपये खात्यात जमा होतील” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मविआ सत्तेत आल्यास, लाडक्या बहिणीला महागाईची झळ बसू नये म्हणून महायुती सरकारपेक्षा ‘डबल‘ म्हणजे दरमहा ३,००० रूपये खात्यात जमा करण्याचं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले.
निवडणूक काळात मतदारांवर आश्वासनांच्या खैरातीचा वर्षाव होत असतो . अनेक योजना याच काळात जन्माला येतात आणि सत्तेची पाच वर्ष पूर्ण होत येतानाच प्रत्यक्षात आणल्या जातात (?).
आता कोण सत्तेत येणार आणि कोण आपली वचनं पाळणार हे येणारा काळच ठरवणार.
लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.