
Tej Police Times
श्रीलंकेच्या नौदलाकडून अटक करण्यात आलेल्या 23 भारतीय मच्छिमारांना जाफना मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलंय. तिथेच त्यांची चाैकशी केली जाईल. यापूर्वी 28 सप्टेंबरला 17 मच्छिमारांना श्रीलंकेकडून अटक करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले होते. ते मच्छिमार देखील रामेश्वरम येथून नेदुनथीवुला मासेमारी करण्यासाठी गेले होते.
‘लॉरेन्स बिश्नोई गँगकडून बोलतोय’…थेट दिली फेसबुक फ्रेंडला धमकी आणि…
एम.के. स्टालिन यांनी त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, मी परत परत तेच सांगतोय की, या गंभीर समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. एक तर समस्या सोडवा किंवा त्यावर ठोस पाऊले उचला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मी 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांना सादर केलेल्या निवेदनात ही विनंतीही केली आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
श्रीलंकेच्या नौदलाकडून 23 भारतीय मच्छिमारांना अटक, ‘हा’ मोठा आरोप, सागरी सीमा…
स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला भारतीय मच्छिमारांची अटक थांबवण्यासाठी मजबूत आणि प्रभावी उपाययोजना सुरू करण्याची विनंती केली होती. आता त्यामध्येच परत श्रीलंकेच्या नौदलाकडून 23 भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आलीये. यामुळे केंद्र सरकार याविषयी काय पाऊले उचलते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. 28 सप्टेंबरनंतर लगेचच परत 23 भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आलीये.
लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.