
Tej Police Times
गवळी कुटुंबीयांची नंधाना गावात शेती आहे. एकनाथ आणि नंदकिशोर गवळी यांनी शेतात सोयाबीन पेरले होते. त्याला खतपाणी देऊन वाढवले होते. मात्र सोयाबीन काढणीला आल्यानंतर मृतक ऍड. रघुनाथ गवळी यांनी सोयाबीन काढून नेल्याने लहान दोन्ही भावांना त्याचा राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केली आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये टाकून बुलढाणा जिल्ह्यातील खडकपुर्णा नदीत फेकून दिला.
बेपत्ता झालेला मोठा मुलगा घरी परत येईल अशी आस लाऊन बसलेल्या आई समोर त्याचा मृतदेहच आल्याने आणि धाकट्या मुलांनीच त्याची हत्या केल्याची माहिती समोर आल्याने आईला मोठा धक्का बसला. संपत्तीच्या वादातून सख्या भावाभावात भांडत होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातील काही भांडण टोकाला जाऊन जीवावर बेतत असल्याचं या घटनेतून निष्पन्न होते.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.