
Tej Police Times
सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीच्यावतीने अकरा उमेदवार नशीब आजमावत आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील होम मैदान येथे सभा झाली. सभेत बोलताना मोदी यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय
पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाने देशात साठ वर्षे राज्य केले. पण, त्यांची विचारसरणी ही समस्या निर्माण करायच्या आणि लोकांना त्या समस्यांमध्ये अडकवून ठेवणे असे काँग्रेस पक्षाचे धोरण राहिलेले आहे. महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या, राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Solapur News : पंतप्रधान मोदींचा मविआवर घणाघात; मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेचवरून थेट नुरा कुस्तीशी केली तुलना
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार पाहिजे असेल तर महायुतीसोबत राहा. महायुती सरकार दूरगामी धोरण आखणार आहे. महाविकास आघाडीवाले ज्या गाडीतून पुढे जात आहेत, त्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. महाविकास आघाडीची गाडी कोण चालवणार, यावरुन त्यांच्यात मारामारी सुरू आहे. महाविकास आघाडीची गाडी सर्वांत अस्थिर गाडी आहे. हे लोक आपापसांत भांडण्यातच सर्वाधिक वेळ घालवत आहेत, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.