
Tej Police Times
देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला मुख्यमंत्री बनण्याची लालसा उरलेली नाही, आपण आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्ट केले होते. यावर देखील आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नक्कीच नाहीत. कोण जाणार गुजरात हिताचं बोलणाऱ्या या लोकांकडे? कोण जाणार आहे महाराष्ट्र द्वेष्टा या लोकांकडे?’ तसेच ‘तुम्ही आमच्यासाठी खिडक्या बंद करा दरवाजे बंद करा. पण फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यातील १६३ मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप
एक मात्र की एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी महाराष्ट्राचे दरवाजे आता बंद आहेत. ज्यांनी महाराष्ट्र लुटला त्यांनी मागच्या दारातून प्रकल्प गुजरातला नेले. त्यांच्याकडे परत कोण जाणार?’ असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान आदित्य ठाकरेंनी मनसेवर देखील निशाणा साधला आहे. ‘जो पक्ष पाच वर्ष झोपलेला असतो तो निवडणूक आल्या की तोडफोड करतो. मारामारी करतो आणि सेटल होतो, त्यानंतर निवडणूक लढतो. त्यांना आम्ही महाराष्ट्रात नेमकं काय काम केलं हे कळणार कसं?, अशी खोचक टीका ठाकरेंनी केली. तसेच ‘मनसेचं असं झालंय त्यांनी बिनशर्ट पाठींबा दिल्यानंतर ते गुजरातच्या भूमिपुत्रांच्या हक्काचे बोलतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर लाठीचार्ज केला. वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला, त्यांना राज ठाकरे पाठिंबा देत आहे. महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा मनसेला विसर पडला आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.