
Tej Police Times
लोकांचे मत काय, त्यांच्या मनात काय आहे हे समजून न घेता निर्णय घेतले जातात. त्या लोकांचे समाजकारण, राजकारण आज ना उद्या उद्ध्वस्त होते. ती अवस्था या ठिकाणी होईल, असा विश्वास शरद पवारांनी सभेत बोलताना व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पाडले म्हणून अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली; नांदेडच्या सभेत मुख्यमंत्र्याचे अजब वक्तव्य
मकरंद पाटलांचा समााचार घेण्याआधी शरद पवारांनी राज्यातील महिलांवरील अत्याचाराबद्दल सरकारवर टीका केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बहुसंख्य लोक फुटून गेले. मला हा अनुभव काही नवा नाही. १९८० साली ५८ निवडून आले होते. अंतुले मुख्यमंत्री होते. मी काही कामानिमित्त १० दिवस लंडनला गेलो. आल्यावर कळाले आमच्यातील ५२ लोक सोडून केले. मी ५८ आमदारांचा विरोधी पक्ष नेता होता. तो फक्त ३ आमदारांचा नेता झालो. तेव्हा सर्वजण म्हणाले, पक्ष फुटला आमदार निघून केले आता कसं व्हायचे. मी म्हटले गप्प बसा, बघू काय करता येईल. त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. ३ वर्षानंतर निवडणूक झाली. त्या ५८ मधील जे ५२-५३ सोडून गेले होते, त्यापैकी एकही निवडून आला नाही. लोकांनी त्यांची जागा दाखवली, अशी आठवण पवारांनी सांगितली.
हळूच कानात येऊन म्हणाले- तिकडे गेलो नाही तर तुरुंगात जावे लागेल; शरद पवारांनी भर सभेत मुश्रीफांना उघडे पाडले
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, इथे असे काही होईल असे मला वाटले नव्हते. इ्थले जे सहकारी होते ते अत्यंत प्रेमाने आणि निष्ठेने बोलायचे. मला आठवते पक्ष फुटला आणि दुसऱ्या दिवशी मी ठरवले चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन नमस्कार करावा, त्यांचे आशिर्दवाद घेऊन पुन्हा पक्ष बांधण्याच्या कामाला सुरूवात करायचे. मी मुंबईहून निघालो तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते गाडी थांबवायचे भेटायचे. इथे आल्यावर गाडी थांबवली बघितले तर कोण मकरंद पाटील होते. ते माझ्यासोबत गाडीत बसले, आम्ही चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मला वाटले हा गडी सोबत असेल. पुन्हा बघतोय तर थोड्या दिवसांनी गडी गायब…विचार केला कालपर्यंत ठीक होते आता काय झाले. चौकशी केली तर सांगितले की, आमच्या कारखान्याचे दुखणे आहे. मी म्हटले, कारखान्याचे दुखणे असेल तर त्यातून काय मार्ग काढायचा हे आपण बसून ठरवू. सत्ता गेली म्हणजे सगळेच जाते असे नाही, आपण मार्ग काढू शकतो. हा रस्ता योग्य नाही.
आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायच असा हा प्रकार म्हणत शरद पवारांची हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका
आज मकरंद पाटील लोकांना सांगतात की साहेब आमच्या मनात आहेत. त्यांची जागा हृदय आहे. आता हृदय इतकी जागा इतकी मोठी आहे का मला येथे ठेवायला. साहेब आमच्या हृदयात बसतात, आम्ही निष्ठावान, आमचे दैवत, साहेब छातीमध्ये, साहेब अंतमनात; अरे किती ठिकाणी ठेवणार? कुठे कुठे बसू मी,बसायला आता जागा शिल्लक राहिली नाही असा टोला पवारांनी लगावल्यावर एकच हशा पिकला.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.