
Tej Police Times
भोकरचे काँग्रेस उमेदवार पप्पू पाटील कोंढेकर आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार प्रा.रविंद्र चव्हाण यांच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नांदेडमध्ये उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अशोक चव्हाणांवर टीकास्त्र डागले. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.
प्रियंका गांधींच्या रॅलीदरम्यान मोठा राडा, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले, नागपुरातील वातावरण तापले
रेड्डी पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राची निवडणूक ही गद्दारांना धडा शिकवण्यासाठीची निवडणूक आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेसोबत गद्दारी करून गुजरातचे गुलाम बनले. अजित पवार यांनी शरद पवारांसोबत गद्दारी करून गुजरातचे गुलाम झाले. हे सर्व नेते महाराष्ट्राला गुलाम बनवत आहेत.’
आपल्या १८ मिनिटाच्या भाषणापैकी १२ मिनिट रेड्डी यांनी अशोक चव्हाणांनाच लक्ष्य केले. ‘काँग्रेसने चव्हाण यांना गल्ली ते दिल्ली मान सन्मान मिळवून दिला. तरी ही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. ज्या नांदेडकरांनी त्यांना नेता बनवले, त्यांनी पक्ष बदलून नांदेडचे नाव खराब केले आहे. आता भोकरमधून त्यांनी कन्येला निवडणूकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये अमाप संपत्ती कमवली, किती संपत्ती आहे, हे त्यांनाही माहित नसेल. त्यांची हिम्मत म्हणजे पैसेच आहेत, चव्हाण यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत.’ अशी जहरी टीका रेड्डींनी केली. तसेच ‘चव्हाणांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या ज्या वस्तू आहेत. त्यापण घेऊन टाका,’ असा अजब सल्ला रेवंत रेड्डींनी जनतेला दिला.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.