तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Chhatrapati Sambhajinagar: ‘स्मार्ट रस्त्यांना’ हवा निधी; राज्य सरकारकडे ३५ कोटींसाठीचा प्रस्ताव दाखल

0 38

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांच्या कामांवर आतापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारच्या निधीचा वाटा मोठा आहे.

महाराष्ट्र टाइम्स
smart city road work AI

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘स्मार्ट सिटी’ मार्फत करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या कामांना ३५ कोटी रुपयांची गरज आहे. एवढा निधी कमी पडत असल्यामुळे सरकारकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्त्यांच्या कामांवर आतापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला आहे. त्यात राज्य सरकारच्या निधीचा वाटा मोठा आहे. त्याशिवाय महापालिकेचा फंड आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा फंड याचा समावेश आहे.

आमदार – खासदारांच्या निधीतून देखील बऱ्याच रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत, पण ही कामेअंतर्गत रस्त्यांची आहेत. स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरातील १११ रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ३१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. ‘स्मार्ट सिटी’कडे एवढा निधी नसल्यामुळे सिटी बससाठीची दोनशे कोटींची ठेव प्रशासनाने मोडली. सिटीबसचे दोनशे कोटी रुपये रस्त्यांच्या कामांसाठी वळवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९२ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांसाठी निधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान ३५ कोटी रुपयांचा निधी मिळाल्यास उर्वरित रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे मानले जात आहे.
भाजपची मोठी कारवाई; नाशिकच्या सात माजी नगरसेवकांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी
या कामांसाठी ‘स्मार्ट सिटी’कडे निधी नसल्यामुळे आणि महापालिकेकडे निधीची वानवा असल्यामुळे सरकारकडे निधी मागण्याचा निर्णय महापालिका व ‘स्मार्ट सिटी’च्या व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासाठीचा प्रस्तावदेखील सरकारला पाठवण्यात आला असून, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर या प्रस्तावाबद्दल सरकार विचार करील, असे मानले जात आहे.
Nandurbar News: असह्य वेदना, रस्ता नसल्यानं गर्भवतीसाठी केली बांबूची झोळी; पण रुग्णालय गाठण्याआधीच…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावाबद्दल सकारात्मक विचार करण्यात येईल, असे संकेत सरकारकडून मिळाले आहेत. सरकारने निधी दिल्यावर रस्त्यांची नियोजित कामे पूर्ण होऊ शकतील. विकास योजनेतील रस्त्यांच्या कामांसाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.