
Tej Police Times
येथे समस्यांचा, प्रश्नांच्या ढीग आहे.वेगवेगळ्या विषयाच्या डिगऱ्या हातात असताना, दोनशे, तीनशे रुपयाची मजुरीसाठी राज्याची सीमा ओलांडणारा बेरोजगार तरुण नेत्यांना दिसत नाही. दिसला तर त्यावर कुणी बोलत नाही. गरीब मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी नाही. बसायला नीट जागा नाही. विद्यार्थी आहेत मात्र शिक्षक नाहीत. शिक्षक असले तर विद्यार्थी नाही अशी बिकट अवस्था ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेची झालेली आहे. किती किती प्रश्न, हे प्रश्न कुणालाही महत्त्वाचा वाटू नये, हिच मोठी शोकांतिका आहे.
खुर्चीसाठी लाखो करोडो रुपये उधळणारे नेते जनतेच्या महत्वाचा प्रश्नाकडे खरंच लक्ष देतील काय? यांना गरिबांचे दुखणं कळेल काय? विधानसभा निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला ही चर्चा जर खरी असेल तर जनतेची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा असणारा गरीब नेता, सामाजिक कार्यकर्ता निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत करेल काय ? ही सिस्टम फारच घातक ठरणारी आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदार संघात पैसे वाटपाच्या ज्या घटना पुढे आल्यात किंवा ज्या चर्चा आहेत. त्याची गंभीरतेने दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. दोषी असल्यावर कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. नाहीतर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचेच राजकारण असेल. तसे झाले तर लोकशाहीसाठी हे फारच घातक ठरणारे आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.