
Tej Police Times
दरम्यान राज्यातील तिसऱ्या आघाडीची सत्तास्थापनेबद्दल काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता आमदार बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले, आम्हाला महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून संपर्क सुरू आहे. अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ.
फडणवीसांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक; तितक्यात राज ठाकरेंचा खास नेता दाखल; भुवया उंचावल्या
बच्चू कडू पुढे म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क करणे सुरू आहे. पण एकदा कल हातात आल्यानंतर मगच आम्ही निर्णय घेऊ, फोन दोन्हीकडून आलेले आहेत. पण आम्ही वेगळ्या सरकारचे स्वप्न पाहात आहोत.
तर बच्चू कडूंनी निवडणुकीतील संभाव्य विजयावर देखील भाष्य केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते जसे आम्हाला संपर्क करत आहेत, तसेच आम्ही देखील संपर्क करत आहोत. माझ्या पक्षाचे ४ ते ५ उमेदवार निवडून येतील, असा विश्वास आहे. तिसऱ्या आघाडीला घेऊन आम्ही सरकार बनवणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याऐवजी आपल्या सरकारचे स्वप्न पाहणे महत्वाचे आहे असे मला वाटते, पाठिंब्याची वेळ येणारच नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.