
Tej Police Times
एकनाथ शिंदे निवडणूकीपूर्वी विधानसभेत म्हणाले होते की, ” आमच्या पक्षाचे ५० आमदार मी निवडून आणणार. त्यापेक्षा एकही आमदार कमी येऊ देणार नाही. त्याचबरोबर आमचे आणि भाजपाच्या मित्र पक्षाबरोबर आमचे २०० आमदार जिंकतील. हा माझा शब्द आहे. विधानसभेत मी हा सर्वांना शब्द देत आहे. जर आमचे आणि भाजपाचे मिळून २०० आमदार आले नाहीत, तर मी गावी शेती करायला जाईन. ” एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता. पण एकनाथ शिंदे यांनी आपला दिलेला शब्द हा खरा करून दाखवला आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत, तर भाजपा आणि मित्रपक्षाचे मिळून २०० पेक्षा जास्त आमदार आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याचे आता समोर आले आहे.
एकनाथ शिंदेनी आपला शब्द खरा करुन दाखवला, निवडणूकीपूर्वी म्हणाले होते २०० आमदार आले नाही तर…
एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर युती करत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात बऱ्याच योजना सुरु करण्यात आल्या आहेत. यामधील लाडकी बहिण योजना ही चांगली गाजली. या योजनेनुळेच महाराष्ट्रात महिलांनी जास्त मतदान केल्याचे म्हटले जात आहे. आता महायुतीला बहुमत मिळाले आहे, पण मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
लेखकाबद्दलप्रसाद लाडप्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.