
Tej Police Times
यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उतरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला. त्यामुळे मनसेचे इंजिन म्हणजे आमदार नसलेला पक्ष ठरला आहे.
किंमत एका मताची! मतदान करुन ८८ वर्षीय आजोबांनी घेतला जगाचा निरोप, डॉक्टरांना विनंती करुन बजावले होते कर्तव्य
एकीकडे राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होत असली तरी त्यांचे मतांत रूपांतर होत नाही, हे पुन्हा एकदा विधानसभेच्या निकालानंतर दिसून आले. पक्षाकडून वर्षभरात कोणत्याही ठोस कार्यक्रमांचे आयोजन न करणे, पक्ष संघटना कायम सक्रिय न ठेवणे आणि धोरण सातत्याचा अभाव या प्रमुख कारणांमुळे पक्षाला यंदाच्या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही. निवडणुका किंवा एखाद्या विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया इतकीच मनसेची कार्यक्रम पत्रिका उरली आहे. सोबतच, कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीच्या काठाने होणारे राजकारण पक्षाची विश्वासार्हता बुडविणारी ठरल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
परभणीत मशालच, ठाकरेंच्या शिलेदाराकडून शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव, कोणाला किती मतं मिळाली?
मनसेच्या मतांचा टक्का घसरलामनसेला २००९च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ५.७१ टक्के मते मिळाली होती. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. सन २०१९च्या निवडणुकीत हाच टक्का अवघा २.२५ टक्के राहिला. यंदा त्यात आणखी घट झाली असून मनसेचा जनाधार आता अवघ्या १.६० टक्के इतका तुटपुंजा आहे.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.