
Tej Police Times
यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भाजपाने राजेश वानखडे यांना मैदानात उतरवले होते. राजेश वानखडे यांनी जोरदार टक्कर देत या निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूर यांचा पराभव केला. आता राजेश वानखडे यांनी याबद्दल मोठे भाष्य केले. ते यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका करताना देखील दिसले आहेत. राजेश वानखडे हे म्हणाले की, यशोमती ठाकूर यांनी मतदार संघामध्ये केलेल्या पैशाच्या चिखलात कमल फुललं आहे.
मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळेल अशी आशा, अब्दुल सत्तार थेट म्हणाले, मराठवाड्याला नक्की..मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या दुष्टीने गावातील रस्ते, नाले, पाणी यावर विशेष काम झालेले नाही. यशोमती ठाकूर यांनी जे आराखडे म्हणून काम केले ते सांगतात, असे कोणतेही आराखडे नाहीत. सर्व सामान्य जनतेचा रोष होता म्हणून यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला. तिवसा मतदारसंघात 15 वर्ष आमदार असताना पाणी पुरवठा करू शकल्या नाहीत. हेच नाही तर त्यांनी एमआयडीसीमध्ये कोणतेही उद्योग आणले नाहीत.
देवेंद्र फडणवीस यांनी उद्योग आणले आणि यशोमती ठाकूर यांनी फक्त पैसे खाण्याचे काम केले. तरुणांसाठी काही केलेले नाही, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एखादे सेंटर तरी उघडायचे होते. यशोमती ठाकूर यांनी आराखड्यात बांधलेली एक ही गोष्ट कामाची नाही, असेही भाजपाचे नवनिर्वाचित आमदार राजेश वानखडे यांनी म्हटले. त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केल्याचे बघायला मिळाले. यशोमती ठाकूर या तिवसा मतदार संघामध्ये सलग पंधरा वर्ष आमदार होत्या.
लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.