
Tej Police Times
विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून अजित पवार पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल, असे ओपन चॅलेंज मिटकरींनी दिले होते. मात्र, अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी ८ वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचे, असा प्रहार देखील मिटकरींनी केला होता. यासोबतच अजित पवार जर एक लाखांच्या मतांच्या फरकाने जिंकले किंवा दादा विजयी झाले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरी घरगडी म्हणून राहावे आणि अजित पवार पराभूत झाले तर मी आव्हाडांच्या घरी घरगडी म्हणून कामाला जाईल’, असेही चॅलेंज मिटकरींनी दिले.
Pune News: शरद पवारांच्या गडाला महायुतीचा सुरुंग; लोकसभेचा वचपा काढला, पुतण्याकडून काका चारीमुंड्या चित
आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स हँडलवर पोस्ट म्हणाले की, डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं. ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे आता सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि आपले चॅलेंज पूर्ण करावे.
यासोबतच मिटकरींनी अजित पवारच महायुतीचे मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. आमच्या अपेक्षित जागा निवडून आल्या आहेत. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्रीपद घेऊ, असेही मिटकरी म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल ४१ जागा आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळाले आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.