
Tej Police Times
मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील बोरधरणकडे जात असलेल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसचा आज अपघात झाला. पेंढरी गावाजवळ बस अपघातात उलटली आणि या दुर्घटनेत एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. सकाळी ५ बसांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होता, त्यात ४ बस पुढे निघाल्या, तर शेवटच्या बसचा चालकाचं नियंत्रण सुटून बस उलटली. ज्यामुळे बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्वरित मदत केली आणि जखमी विद्यार्थ्यांना नागपूरमधील मिहान येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अधिक तपास केला जात आहे.
या घटनेनं शालेय बसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शाळांना आणि स्थानिक प्रशासनाला शालेय वाहतूक सुरक्षा अधिक चोख करणे आवश्यक आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुढे योग्य उपाययोजना घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.