Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Bihar Pattern In Maharashtra: राज्यात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा, अशी शिवसेना नेत्यांची मागणी आहे. नितीश कुमार यांचे कमी आमदार निवडून आले तरीही भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं, तसंच महाराष्ट्रातही करण्यात यावं, यासाठी शिवसेना आग्रही आहे.

१. भाजपनं १३२ जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या कोट्यातून लढलेले लहान पक्ष आणि भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार यांची बेरीज गेल्यास हाच आकडा १३७ वर जातो. बहुमताचा आकडा १४५ आहे. बहुमताला केवळ ८ आमदार कमी असताना ५७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास भाजप तयार नाही. जनतेनं भाजपला भरभरुन मतदान केलं असताना, अतिशय स्पष्ट कौल दिलेला असताना भाजपनं आपला मुख्यमंत्री केल्यास तो जनादेशाचा अपमान ठरेल, असं भाजपला वाटतं.Eknath Shinde: शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं! मोदींच्या सहकाऱ्यानं बॉम्ब टाकला; शिवसेना नेत्यांचा संताप
२. बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यास भाजप तयार नाही. कारण दोन्ही राज्यांत असलेली परिस्थिती वेगळी आहे. २०१५ मध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूनं काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करुन निवडणूक लढवली. त्यात त्यांनी भाजपप्रणित एनडीएचा पराभव केला आणि मुख्यमंत्री झाले. पण २०२० च्या विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपसोबत गेले. सत्ता आल्यास पुन्हा तुम्हालाच मुख्यमंत्री करु, असा शब्दच त्यांना भाजपकडून देण्यात आला होता. पण महाराष्ट्रात तसं कोणतंही आश्वासन शिंदेंना दिलेलं नसल्याचं भाजपचे नेते सांगत आहेत.
३. २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपनं १२२ जागा जिंकल्या होत्या. आता कोणतीही लाट नसताना भाजपनं १३२ जागांवर यश मिळवलं. त्यामुळे आता भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा त्याग करु नये, असं कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना वाटतं. भाजपनं एकनाथ शिंदेंना नितीन कुमार यांच्या इतकं मोठं करु नये, अशीही भाजप कार्यकर्त्यांची भूमिका आहे. २०१९ मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. २०२२ मध्ये शिंदेंसोबत सत्ता आणूनही मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. मित्रपक्षांसाठी सतत आपणच बलिदान करायचं का, असा प्रश्न कार्यकर्ते नेत्यांना विचारत आहेत. त्यामुळे राज्य भाजपच्या नेतृत्त्वावर दबाव वाढला आहे.Eknath Shinde: उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर…; शिंदेंना भाजपकडून ‘एक्स्चेंज ऑफर’, महाशक्ती मागे हटेना
४. भाजपला १३२ जागा जिंकून देण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत संघ बऱ्याच प्रमाणात निष्क्रिय राहिला. त्याचा फटका भाजपला बसला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे संघानं आपली पूर्ण ताकद लावली आणि महायुतीला विजय मिळवला. याच कारणामुळे मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयात संघाची भूमिका महत्त्वाची आहे. संघ भाजपच्या, त्यातही फडणवीसांच्या नावासाठी आग्रही आहे. संघाचं भाजपच्या विजयातील योगदान पाहता त्यांचं म्हणणं डावलता येत नाही. संघाच्या स्थापनेला पुढील वर्षी शंभर वर्ष होत आहेत. या महत्त्वाच्या वर्षी संघाची स्थापना झालेल्या महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असावा, अशी संघाची इच्छा आहे.