
Tej Police Times
महायुतीत अजित पवारांची एन्ट्री झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. तर देवेंद्र फडणवीस २०२२ पासून एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. आता त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. तर शिंदे त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री होतील. त्यामुळे महायुतीत २ उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम असेल. महायुतीला विधानसभेत शिंदेंच्या नेतृत्त्वात नेत्रदीपक यश मिळाल्यानं पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा शिवसेनेचा आग्रह होता. त्यासाठी बिहार पॅटर्नचा दाखलाही देण्यात आला. पण भाजपनं मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला.
पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी शिंदे आग्रही होते. शिवसेनेच्या आमदारांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीसांची भेटही घेतली. पण दिल्लीतील भाजप नेतृत्त्वानं मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं. नाराज झालेल्या शिंदेंची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. भाजपला विधानसभा निवडणुकीत १३२ जागांवर विजय मिळाला. देवेंद्र फडणवीसच या यशाचे शिल्पकार असल्यानं त्यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्रिपद सोडणाऱ्या शिंदेंना मंत्रिमंडळातील चांगली खाती देण्यात येणार असल्याचं समजतं. यासोबतच केंद्रातही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात एकूण ४३ मंत्रिपदं आहेत. यातील १२ मंत्रिपदं शिवसेनेला दिली जाण्याची शक्यता आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १० मंत्रिपदं मिळू शकतात. उर्वरित २१ मंत्रिपदं भाजप स्वत:कडे ठेवेल.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.