
Tej Police Times
निवडणुकीत मोठा झटका बसल्यानंतर आता राज ठाकरे काय करणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशी देखील चर्चा आहे की जर दोन्ही भाऊ एक झाले तर सेफ होतील या तत्त्वावर चालतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही हे येणारा काळच सांगेल. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेचे सर्व उमेदवार राज ठाकरे यांच्या निवासस्थानावर आले.
माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर; एखादा पक्ष, व्यक्ती ठरवणार का? सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारांनी ईव्हीएमवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच बरोबर पक्षाला भाजपच्या जवळीकतेचा फटका बसला. लोकांच्या मते मनसे विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी करणारा पक्ष असल्याचे मत तयार झाले आहे. काही उमेदवारांच्या मते पक्षाला अधिकृतपणे महायुती सहभागी झाले पाहिजे.
राज्यातील राज्यसभा निवडणुकीनंतर दोन्ही भावांनी एकत्र यावे असे पोस्टर राज्यातील विविध ठिकाणी लागले आहेत. काही उमेदवारांनी असा देखील सल्ला दिला की, पक्षाने महायुतीत सहभागी होऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत किमान ३० जागा तरी मागाव्यात. त्याच बरोबर परिषदेच्या निवडणुकीत एक किंवा दोन जागेची मागणी करता येईल.
निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे आता या सूचनांवर काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. जानेवारी महिन्यात मुंबईसह राज्यातील ४५ महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या आधी मनसेला भविष्याबाबतचा निर्णय घ्यावा लागले. २०१७ च्या मुंबई पालिका निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवक शिवसेनेत गेले. आता मनसेकडे एकच नगरसेवक आहे.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.