
Tej Police Times
कार्तिक अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे. या दिवशी स्नान करुन तर्पण केल्यानंतर कच्चे तांदूळ, डाळ, गहू इत्यादी दान करता येते. तर घरात सात्विक अन्न तयार करुन त्यातील काही भाग काढून घ्यावा. तो भाग गाय, कावळा, कुत्रा यांना खाऊ घालावा. याला पंचबली कर्म असे म्हणतात.
कार्तिक अमावस्येला पितरांच्या नावाने दिवे दान करा. परंतु, हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा. त्यानंतर मातीच्या दिव्यात राईचे तेल घालून वात ठेवा. दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला ठेवा. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहातो. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रगती टिकून राहाते.
जर तुमच्या कुंडलीत पितृदोष तयार झाला असेल तर कार्तिक अमावस्येला गायीची सेवा करुन तुळशीची पूजा करावी. गाईची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच तुळशीच्या कृपेने अनेक संकटे दूर होतात. कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येईल. अमावस्येच्या दिवशी गाईचे दान केले जाते.
कुंडलीत पितृदोष असेल आणि त्यामुळे तुम्हाला सतत अडचणी येत असतील तर अमावस्येच्या दिवशी गरुड पुराणाचे पठण करा. गरुड पुराणाचे पठण केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. तसेच भगवान विष्णूच्या कृपेने मोक्ष प्राप्ती होते.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.