
Tej Police Times
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळेच पक्ष स्वबळावर लढले. भाजपनं सर्वाधिक १२२ जागा जिंकल्या. बहुमतापासून दूर असल्यानं त्यांना शिवसेनेची गरज होती. विधानसभा स्वबळावर लढलेल्या शिवसेनेनं ६३ जागांवर बाजी मारली होती. सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेचा पाठिंबा अतिशय गरजेचा होता. त्यामुळे शिवसेनेचं महत्त्व प्रचंड वाढलं. शिवसेनेला महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता वाढली होती.
शिंदेंची माघार, आता दादांची मोठी मागणी; NCP प्रचंड आग्रही, नव्या चेहऱ्यांची लागणार वर्णी
सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील अशी परिस्थिती असताना शरद पवार तिरकी चाल खेळले. त्यांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राज्यात भाजपचं सरकार आलं. राष्ट्रवादीनं बाहेरुन पाठिंबा दिल्यानं शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घटली. भाजपला शिवसेनेची फारशी गरज राहिली नाही. अखेर शिवसेनेनं सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना अतिशय दुय्यम मंत्रिपदं देण्यात आली.
२०१४ मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेनेला धोबीपछाड दिला होता. आता त्याच पवारांच्या पुतण्यानं टाकलेल्या डावामुळे शिवसेनेला धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत ५७ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावेत, अशी मागणी शिवसेनेनं लावून धरली. मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्या, अशी विनंती सेनेनं राष्ट्रवादीकडे केली होती.
ते ‘पुन्हा येणार’! फडणवीसांचा मार्ग मोकळा; शिंदेंनी कोणत्या अटींसह CMपदावरील दावा सोडला?
शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असताना राष्ट्रवादीनं आपलं वजन भाजपच्या पारड्यात टाकलं. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडावा लागला. २०१४ मध्ये काकांनी टाकलेला डाव यावेळी पुतण्यानं टाकला. दोन्हीवेळेला गेम मात्र शिवसेनेचाच झाला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.