
Tej Police Times
गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरही बंटी शेळके यांनी मतदारसंघ सोडला नाही. यावेळी देखील त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची चर्चा होती. उमेदवारांची घोषणा होत असताना मध्य नागपुरातून काँग्रेसकडून इतर उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची चर्चा होती. अशा स्थितीत शेळके यांनी उमेदवारी खेचून आणत पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली. निकालानंतर पाच दिवसांनी शेळके यांनी थेट मुंबईतच पटोले यांच्यावर शरसंधान केले.
गेल्या निवडणुकीत चार हजार मतांनी पराभूत झालो. त्या निवडणुकीतही पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना माझे काम करू नये, अशी सूचना केली होती. नाना पटोले यांनी या निवडणुकीत पॅनलमध्ये नाव नव्हते पाठवले. बहुतांश ब्लॉक अध्यक्ष माझ्या बाजूने नव्हते. दोन महिला अध्यक्ष माझ्या विरोधात नियुक्त केल्या. मध्यतील कुणालाही पद हवे असल्यास माझा विरोध करावा, अशी त्यांची भूमिका राहिली, असा घणाघाती आरोप शेळके यांनी केला.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली. मात्र, असा घात होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. पक्षाचे चिन्ह असताना माझी अपक्षासारखी स्थिती झाली. संपूर्ण संघटन गायब होते. प्रभारी सुखदेव पानसे, कुणाल चौधरी, महिला अध्यक्ष अलका लांबा यांना सर्व घडामोडींची कल्पना होती. निवडणुकीत बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. पटोले यांनी इतरांची भाजपशी हातमिळवणी करून दिली होती. प्रियांका गांधी यांचा रोड शो झाला, त्यात पक्षाचे काही योगदान नव्हते, असा दावा बंटी शेळके यांनी केला.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.