
Tej Police Times
मतदानाच्या दिवशी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रात एकूण ६५.२ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे. परंतु २१ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम आकडेवारीनुसार ही आकडेवारी ६६.०५ टक्के इतकी होती. त्यानंतर मात्र राजकीय वातावरण तापू लागले. २३ नोव्हेंबरला चकीत करणारे आकडे समोर आल्यानंतर मात्र महाविकास आघाडीकडून ईव्हीएमसह मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचा महायुतीत दबदबा वाढला, आता पारड्यात पडणार इतकी मंत्रिपदं
या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी निवेदन जारी केले आणि वाढलेल्या मतटक्क्याबाबत माहिती दिली. शहरी आणि निमशहरी भागात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान मतदानाच्या सायंकाळी जाहीर केलेली आकडेवारी ही फोनवरील संभाषणांवर आधारित होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सायंकाळी उशिरा ईव्हीएम सील करण्यात आल्याने अंतिम आकडेवारी नंतर घेण्यात आली. यातच महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक मतदान केंद्रे होती, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा आलेख चढा राहिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोगाच्या या उत्तरावर आक्षेप घेतला. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी दाखवली. तेव्हा ती ५८ टक्के होती, रात्री ११ वाजून ५९ या वेळेला ही टक्केवारी ६५.२ टक्के होती. लांबच लांब रांगा खरंच होत्या का, त्या रांगा कुठे होत्या, याचे उत्तर आम्ही निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. दुसऱ्या दिवशी आयोगाने मतदानाची टक्केवारी १.३% ने वाढवली असा आरोप करत त्यांनी आम्ही निवडणूक आयोगाला विचारू इच्छितो की हे मतदान कुठे झाले?’ असेही ते म्हणाले.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.