
Tej Police Times
आम्ही असतो तर राष्ट्रपती राजवट लावली असती. निकाल लागून वेळ झाला आहे. निकालाबाबत लोकांच्या मनात संशय असून ते खूशही नाहीत. स्वत: काळजीवाहू मुख्यमंत्री नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर आपल्या गावाला गेले आहेत. अमावस्येचं काय महत्त्व आहे हे मला कळत नाही, त्यांच्या गावामध्ये कोणती देवी आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, होतायेत महाराष्ट्र वाट पाहतोय कधी घोषणा होतेय का आणखीन कोणाचं नाव येतंय हे मला माहित नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार माहिती समोर येत आहे पण तो सूर्य काही उजाडत नाहीये. नोव्हेंबर संपेल आणि डिसेंबर उजाडेल, तुम्ही पाच तारखेचा वायदा करत आहात पण तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील याचा भरोसा नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते मनानं खचलेत, अस्वस्थ असून त्यांचं मानसिक आणि शारीरिर स्वास्थ बिघडलंय त्याला जबाबदार कोण? त्यांना कोणी काही शब्द देऊन फिरवलाय का? असे अनेक गंमतीशीर विषय चर्चेत आहेत. मी फक्त लाडका भाऊ इतकंच बडबडतायेत. पण ते आता मोदी शहांचे लाडका भाऊ राहिलेले दिसत नाहीत. देवेंद्रजींचेही लाडके भाऊ दिसत नाहीत पण ते सतत लाडका भाऊ बडबडत आहेत, त्यांना उपचाराची गरज आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य पद्धतीने उपचार केले पाहिजेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
या राज्याच्या निकालाबाबत देशातच नाहीतर जगातील अनेक भागांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. ७६ लाख मते वाढली कशी? सामना चित्रपटामधील मारुती कांबळेचं झालं काय? तसं या ७६ लाख मतांचं काय झालं आणि ५ वाजल्यापासून ७ वाजेपर्यंत ही मते कुठून आलीत. हरियाणामध्ये १४ लाख मते वाढली होतीत. तर महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये पाच पासून साडे अकरापर्यंत ७६ लाख मतांचा हिशोब लागत नाही. हा वाढलेली मतेच महायुतीच्या विजयाचे शिल्पकार आहेत. लाडकी बहीण योजना या योजनांमध्ये काही तथ्य नाही, असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा ईव्हीएम निकालाबाबत शंका उपस्थित केली आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.