Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकनाथ शिंदेंना भरला ताप, शरीराचे तापमान हे १०४°; सत्तास्थापना रखडणार?

13

Caretaker CM Eknath Shinde at Daregaon: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळगावी दरे येथे मुक्कामी आहेत. सत्तास्थापनेच्या लगबगीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे.

Lipi

संतोष शिराळे, सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळगावी दरे येथे मुक्कामी आहेत. सत्तास्थापनेच्या लगबगीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याचे समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे १०४° असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याची माहिती आहे.

प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज घराबाहेर पडलेले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. राजकीय वातावरण तापले असताना शिंदेंच्या शरीराचेही आता तापमान वाढले आहे.
नव्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला किती खाती, फॉर्म्युला ठरला; भाजपश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार? यावरून महायुतीमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडणार जवळपास निश्चित झाले आहे. पण आता शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते असतानाच एकनाथ शिंदेंनी थेट मूळ गाव गाठल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

एकनाथ शिंदे गावी गेल्याने शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले होते. काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तरच ते आपल्या मूळगावी जातात असे शिरसाट म्हणाले. तर शनिवारी सायंकाळी मोठा निर्णय घेतील असेही शिरसाटांनी नमूद केले होते. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या गावी जाण्यावरुन टोला लगावला. ते म्हणाले, त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? ज्यासाठी शिंदेंना तिथे जावं लागलं.

दीपक केसरकर माघारी परतले

शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना महाबळेश्वरवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान, दीपक केसरकर मुंबईला रवाना झाले आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा दरे गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.