Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नव्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला किती खाती, फॉर्म्युला ठरला; भाजपश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

9

Maharashtra Government Formulation: मुख्यमंत्री पद कोणाला यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून आता राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यमंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महायुतीचेच सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री पद कोणाला यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला असून आता राज्य मंत्रिमंडळातील खाते वाटपावर लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यमंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वृत्तानुसार, राज्यमंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्र्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप पक्ष स्वत:कडे २२ खाती ठेवणार आहे. शिवसेनेच्या पारड्यात १२ खाती पडणार आहेत. तर अजित पवारांच्या वाट्याला १० खाती येणार आहेत, असा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.

भाजप हा यंदाही मोठा पक्ष ठरल्याने शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपसोबत वाटाघाटी कराव्या लागणार आहेत. भाजप हा प्रामुख्याने सत्तेतील आपले वर्चस्व राखण्यासाठी तशी रणनीती आखताना दिसत आहे. जेणेकरुन युतीतील प्रत्येक पक्षावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. पण अद्याप मंत्रिमंडळाचे खातेवाटप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही.
Murlidhar Mohol : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी धक्कादायक चेहरा? मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे गणित कसे असणार आणि यासंदर्भात असणारे पेच सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आशा वाढल्या आहेत, पण अद्याप यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अंतिम निर्णय येणे बाकी आहे.

एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत दिले होते. भाजप मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेणार त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असणार असल्याचे भाष्य त्यांनी केले. तर पंतप्रधान मोदींवर माझा विश्वास असून मी त्यांच्या निर्णयात माझा अडथळा राहणार नाही, असेही एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर समोर आलेल्या फोटोवरुन शिंदे काहीसे उदासीन असल्याचे दिसत आहे. यातच त्यांनी शुक्रवारी अचानक आपल्या मुळगाव दरे गाठले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.