Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Baba Adhav : बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात पुण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. महायुतीचे नेते अजित पवार त्यांना भेटायला गेले होते. यावेळी बाबा आढाव यांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम, अदानी ते पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
महाराष्ट्राच्या १९५२ पासून आजतागयत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यापैकी या निवडणुकीमध्ये पैशांचा धुमाकूळ झाला. सरकारच्या तिजोरीमधून बहिणींनी पैसे देण्यात आले. हा जो प्रकार आहे, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला झालेल्या मतदानामध्ये एवढा बदल का झाला? मला मतदान करताना वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे. बटेंगे तो कटेंगेचे नारे देण्यात आले. यावेळेला ज्या प्रकारचं सरकारी वर्णन दिसलं ते भयंकर आहे. त्यामुळे मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला, कारण मला वेदना झाल्या. अदानी हा फॅक्टर दुर्लक्ष करून चालणार नाही. या प्रकरणाचाही तपास व्हायला पाहिजे. माझ्यासारख्या सुजाण नागरिकाला हे खुपत नाही. केंद्र सरकार लोकशाही हा प्रकार जुमानत नाही. पार्लमेंटमध्ये हजर राहायचं नाही आणि चर्चाही होऊ द्यायची नाही आणि पत्रकारांसोबत बोलायचं नाही. तिकडे विदेशातील लोकांनी सल्ला द्यायचा तो तर भाग वेगळा असल्याचं म्हणत बाबा आढाव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
आमची मागणी एकच आहे या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला गेला पाहिजे. तो छडा सरकार लावू देणार नाही. हातातील सत्ता कोण सोडणार आहे, त्यासाठी जनतेमध्ये गेले पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही इथे आलो आणि लोकं याची दखल घेत आहेत. याचं निराकारण झालं पाहिचे, त्यांनी दाबायचा प्रकरण केला तरी जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण हा जाच सहन करणार नाही. बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य फुकट दिलं नाही, त्यासाठी लढावं लागलं. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना सांगितलं चले जाव, करेंगे या मरेगें, मग इंग्रजांनी म्हणााले नाही की हे सांगणारे तुम्ही कोण? त्यांनी थट्टा नाही केली. माझ्या प्रश्नांचं निराकरण झालं नाहीतर मी महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गाने चालणार. दगड उचलणार नाही, मला याआधी अटक झाली आह, पण सत्याग्रहात झालीये. मी एक दोन नाहीतर ५२ वेळा तुरूंगात गेलोय. माझं म्हणणं आहे की जो मार्ग मी आयुष्यात उचलला तो जनतेला सांगेल, असंही बाबा आढाव म्हणाले.