Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nagar News: नगरमधील ७४ केंद्रावरील EVMची पडताळणी, बारापैकी दहा मतदारसंघात उमेदवारांची मागणी

17

Nagar Latest Marathi News: जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर हे दोन राखीव मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघातील दुसऱ्या क्रमांकावरील पराभूत उमेदवारांनी इव्हीएम पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत.

हायलाइट्स:

  • नगरमधील ७४ केंद्रावरील EVMची पडताळणी
  • बारापैकी दहा मतदारसंघात उमेदवारांची मागणी
  • ७४ ठिकाणच्या इव्हीएमची पडताळणी केली जाणार
महाराष्ट्र टाइम्सनगर मराठी बातम्या
नगर मराठी बातम्या

नगर : नगर जिल्ह्यातील १२ पैकी दहा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत इव्हीएम च्या पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुल्कही भरले असून यानुसार ४५ दिवसांची मुदत संपल्यानंतर ७४ ठिकाणच्या इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे.जिल्ह्यातील अकोले व श्रीरामपूर हे दोन राखीव मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघातील दुसऱ्या क्रमांकावरील पराभूत उमेदवारांनी इव्हीएम पडताळणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या मागणीनुसार जिल्ह्यातील ७४ मतदान केंद्रातील इव्हीएम व व्हीव्हीपॅटची पडताळणी केली जाणार आहे. एका मतदान यंत्राच्या पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये याप्रमाणे निवडणूक आयोगाकडे शुल्क जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १० उमेदवारांचे मिळून ३४ लाख, ९२ हजार ८०० रुपये आयोगाकडे जमा झाले आहेत. यासाठी अर्ज करण्याची मुदत आता संपली आहे. प्रभावती घोगरे (शिर्डी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), संदीप वर्पे (कोपरगाव), शंकरराव गडाख (नेवासा), प्रताप ढाकणे (शेवगाव), राम शिंदे (कर्जत-जामखेड), राहुल जगताप (श्रीगोंदा), राणी लंके (पारनेर), प्रजाक्त तनपुरे (राहुरी) आणि अभिषेक कळमकर (नगर शहर) यांनी हे अर्ज केले आहेत.
फडणवीसच मुख्यमंत्री? भाजप पक्षश्रेष्ठींकडून नावावर शिक्कामोर्तब, अखेर अनिश्चितता दूर

तर आमदारकीचा राजीनामा देईन : पाचपुते

जिल्ह्यातील दहा पराभूत उमेदवारांनी इव्हीएम विरोधात भूमिका घेतली असली तरी श्रीगोंद्याचे भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, ‘निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वास आहे. या प्रक्रियेत काही गैरप्रकार झाल्याचे उघड झाले तर मी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा प्रक्रियेला समोरे जाईन. प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सह्या घेतल्या जातात, त्यामुळे गोंधळाचा आरोप आता करून काहीही साध्य होणार नाही,’ असेही पाचपुते म्हणाले.

विजयसिंह होलम

लेखकाबद्दलविजयसिंह होलमविजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.