
Tej Police Times
देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा काळ देखील पूर्ण केला. पाच वर्षांचा काळ पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री म्हणून नावाजले जातात. परंतु २०१९ मध्ये फडणवीस केवळ पाच दिवस राज्याचे मुख्यमंत्री ठरले. अजित पवारांशी हातमिळवणी करुन त्यांनी ते वेगळे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नाही. अजित पवार पु्न्हा शरद पवारांकडे परतले आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यादरम्यान मात्र फडणवीसांच्या प्रतिमेला डाग बसला होता. पण त्यानंतर तो पुसून काढण्यात ते यशस्वी ठरले. फडणवीसांच्या जवळच्या नेत्याचे म्हणणे आहे की, ते आपल्या मेहनतीमुळे भाजप पक्षात अग्रस्थानी आहेत.
CM कोण? सस्पेन्स संपला, भाजप नेतृत्त्वाचा निर्णय झाला; बड्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
राजकीय वर्तुळात फडणवीसांबद्दल सामान्यतः प्रतिमा अशी आहे की, भाजपमध्ये आरएसएसचा माणूस. परंतु त्यांच्या जवळच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, आरएसएसमध्ये भाजपचा माणूस आहे. फडणवीसांनी अभाविपमधून राजकीय जीवनात पाऊल ठेवले. फडणवीस केवळ वयाच्या २२व्या वर्षी नगरसेवक झाले आणि पुढे केवल पाच वर्षांत म्हणजे २७व्या वर्षी महापौर बनण्याचा मान पटकावला. यानंतर १९९९ मध्ये ते विधानसभेवर पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, २०१४ मध्ये फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजप-शिवसेना युती किती जागा जिंकणार? याचा अचूक अंदाज फडणवीस यांनी वर्तवला होता. आणि तेव्हाच पीएम मोदींचा फडणवीसांवरचा विश्वास दृढ झाला.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हा प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या फडणवीसांनी सर्व भार आपल्यावर घेतला होता, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यानंतर पक्षाने १२२ जागा जिंकल्या. यानंतर पुन्हा शिवसेनेच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात आले. २०१९मध्ये परिस्थिती बिघडली असली तरी, मविआ सरकार कोसळणे आणि महायुतीचे सरकार स्थापन करणे यात फडणवीस यांचीही मोठी भूमिका असल्याचे मानले जाते. महाराष्ट्राचे राजकीय विश्लेषक दयानंद नेने म्हणतात की, आता भाजप ज्याचे नाव निश्चित करेन तोच मुख्यमंत्री होईल. हा पक्ष हायकमांड आणि नवनिर्वाचित आमदारांच्या पसंतीचा विषय आहे, परंतु निवडणुकीत देवाभाऊंना म्हणजेच देवेंद्र यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. अशा स्थितीत ग्राउंड झिरोवर देवेंद्रंची मागणी होत आहे. तर ‘फडणवीस हे महाराष्ट्राचे असे नेते आहेत ज्यांनी थेट शरद पवारांना टक्कर दिली आहे. यामुळेच भाजपने राज्यातील सर्व भागात मविआचा सुपडासाफ केला आहे. महायुतीच्या दणदणीत विजयामुळे फडणवीस यांना सक्षम नेतृत्व म्हणून पुन्हा उभारी मिळाली आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.