तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

समोरुन पैशांचा पाऊस, मनमोकळेपणाने बोलत कैलास गोरंट्याल यांनी सांगितली पराभवाची कारणं

0 33


जालन्याचे पराभूत आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षावरती नाराजी व्यक्त केली.जर मला तिकीट वेळेवर मिळाले असते तर मला मतदारसंघांमध्ये फिरायला मिळाले असते. माझा प्रचार पाहिजे तसा झाला नाही, राहुल गांधीची सभा होती तीही रद्द झाली. काँग्रेसचे मोठे नेते होते ते देखील माझ्या प्रचाराला आले नाही. त्यामुळे माझा पराभव झाला असल्याची खंत कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली.बटेंगे तो कटंगे हे फेक नरेटीव्ह सेट करण्यात आले त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. यासोबत जालना विधानसभा मतदार संघात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला.लाडकी बहीण योजनेमुळेही मोठा धक्का बसला असंही ते यावेळी म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.