Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
job astro remedies : हल्ली नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी कुरबूर सुरुच असते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटतं असते. परंतु बरेचदा असे असूनही आपल्याला नोकरी मिळत नाही. जर शास्त्रानुसार काही उपाय केल्यास करिअरमध्ये खूप प्रगती होते. जाणून घेऊया काय करायला हवे.
Career Astro Tips :
हल्ली नोकरीच्या ठिकाणी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी कुरबूर सुरुच असते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येकाला वाटतं असते. परंतु बरेचदा असे असूनही आपल्याला नोकरी मिळत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अधिक खराब असेल तर नोकरी मिळण्यात किंवा कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर शास्त्रानुसार काही उपाय केल्यास करिअरमध्ये खूप प्रगती होते. जाणून घेऊया काय करायला हवे.
हे उपाय करुन पाहा
- इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी एका लिंबूमध्ये चार लवंगा चारही दिशांना पुरुन ठेवा. यानंतर भक्तीभावाने ओम श्री हनुमंते नम: या मंत्राचा जप करावा. असे केल्याने मुलाखतीत यश मिळते. तसेच लवकर नोकरी मिळण्याची शक्यता असते.
- जर तुम्हाला नोकरीमध्ये अडथळे येत असतील तर पक्ष्यांना दाणे खाऊ घाला. असे केल्याने नोकरीतील अडचणी दूर होतील.
- जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल आणि ती मिळत नसेल तर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जा. हनुमानाची विधिवत पूजा करा तसेच हनुमान चालीसाचे पठण करा. हनुमानाला बुंदीचे लाडू अर्पण करा. नोकरी मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा. हा उपाय केल्याने नोकरी संबंधित समस्या दूर होतात. आणि लवकर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
- स्पर्धा परीक्षेत तुम्हाला सतत अपयश मिळत असेल तर सूर्याची पूजा करणे शुभ मानले जाते. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन अनेक समस्या दूर करतात. सकाळी स्नान झाल्यानंतर नियमितपणे सूर्यदेवाची पूजा करावी. तांब्याच्या भांड्यातून सूर्य देवाला जल अर्पण करा. तसेच “ओम आदित्य नमः” किंवा “ओम घ्रिण सूर्याय नमः” या मंत्राचा जप करा. असे केल्याने समस्यांपासून मुक्तता मिळते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळते. नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळते.
टिप : सदर माहिती सामान्य आहे. महाराष्ट्र टाइम्स असा कोणताही दावा करत नाही.