Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ललित प्रभाकर-सई ताम्हणकरच्या हिंदी सिनेमाचं होतंय कौतुक; 2 दिवसात कमाई मात्र धीम्या गतीने

161

Ground Zero Box Office Collection Day 2: सई ताम्हणकर आणि इमरान हाश्मी यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ग्राउंड झीरो’ची बॉक्स ऑफिसवर धीम्या गतीने कमाई होते आहे.

हायलाइट्स:

  • ‘ग्राउंड झीरो’ची बॉक्स ऑफिस कमाई
  • दोन दिवसात 3 कोटींचा गल्ला
  • धीम्या गतीने झालीये सुरुवात
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

मुंबई: तेजस देऊस्कर या दिग्दर्शकाचा ‘देवमाणूस’ हा मराठी सिनेमा 25 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला, तर याच दिवशी त्याचा ‘ग्राउंड झीरो’ हा हिंदी सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. इमरान हाश्मी, सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि झोया हुसेन यांची मुख्य भूमिका असणारा Ground Zero हा सिनेमा बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ धर दुबे यांच्या 2003 सालातील काश्मीरमधील एका ऑपरेशनवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.15 कोटी रुपये कमावले होते, यामध्ये दुसऱ्या दिवशी वाढ झाल्याचे दिसून आले.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘ग्राउंड झीरो’चे कलेक्शन दुसऱ्या दिवशी वधारले असले तरी, ही कमाई अलीकडेच रीलिज झालेल्या बॉलिवूड सिनेमांच्या तुलनेत धीम्या गतीनेच होते आहे. Sacnilk ने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी या चित्रपटाने सुमारे 1.90 कोटी रुपये (सुरुवातीचा अंदाज) कमावले, ज्यानंतर सिनेमाटी 2 दिवसांची कमाई एकूण 03.05 कोटी रुपये झाली आहे. एकंदरितच या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. देशभक्तीपर थीम आणि कलाकारांचे दमदार काम असूनही ‘ग्राउंड झीरो’ची म्हणावी तशी कमाई झालेली नाही.

काश्मीरमध्ये ‘लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन’ होणार बंद? पहलगाम हल्ल्यानंतर सिनेमा-सीरिजच्या शूटिंगमध्ये अडचणी
सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षक प्रतिक्रिया आणि समीक्षकांनी ‘ग्राउंड झीरो’चे कथानक आणि इमरान-सईच्या दमदार अभिनयाचे कौतुक केले आहे. असे असले तरी, चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची उपस्थिती खूपच कमी आहे. आठवड्याच्या शेवटीच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ न झाल्यास, बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये भविष्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे.

अ‍ॅक्शन, वास्तविक घटना आणि भावना यांचे मिश्रण असणाऱ्या या सिनेमात भारताच्या दहशतवादविरोधी मोहिमेचे कथानक सांगण्यात आले. मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवस आधी न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत, इमरानने काश्मीर खोऱ्यातील अशांततेबद्दल भाष्य केले होते. या सिनेमाचे श्रीनगरमध्ये प्रीमियरही आयोजित करण्यात आला होता. इमरानने नमूद केले होते की, काश्मीर हे त्याठिकाणच्या अद्भुत लोकांसह एक सुंदर ठिकाण आहे, परंतु 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या सुरुवातीला झालेल्या बंडखोरीमुळे काश्मीरला त्रास सहन करावा लागला होता – या चित्रपटाने त्या काळाविषयी भाष्य केले आहे.

जान्हवी भाटकर

लेखकाबद्दलजान्हवी भाटकरजान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. ‘न्यूज १८ लोकमत’मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.