
Tej Police Times
(शैलेश चौधरी)
एरंडोल: दिड ते पावणेदोन वर्षांच्या प्रदिर्घ मुक्कामानंतर सणासुदीच्या दिवसांच्या आधीच कोरोना ने ‘अलविदा,केला.
त्या पाठोपाठ अती लांबलेल्या पावसाने सूध्दा घरवापसी केली त्यामूळे या वर्षा ची दिवाळी अनोखी ठरणार असून दिवाळीनिमित्त लावण्यात येणार्या दिव्यांचा व आकाशकंदीलांच्या प्रकाशाचा झगमगाट गावागावांच्या लगत असलेल्या नदीनाल्यांच्या प्रवाहात दृष्टीस पडणार आहे.
यंदाची दिपावली ही आगळी-वेगळी मानण्यात येत आहे.
कारण, दिपावली च्या दिवसांत तालुक्यातील अंजनी नदी सह नाले व ओढे प्रवाही होऊन वाहत आहेत असे चिञ बर्याच वर्षांनंतर पहावयास मिळत आहे.
विशेष हे की, सप्टेंबर महीन्याच्या अखेरीसच अंजनी धरण,खडकेसिम तलाव,पद्मालय तलाव,भालगाव तलाव,चोरटक्की तलाव यांचेसह तालुक्यातील इतर छोटेमोठे तलाव पाण्याने तूडुंब भरले.
दरम्यान,
पांढर्या सोन्याला समाधानकारक भाव असला तरी सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात मोठी घट आली असल्यास्तव बळीराजा असमाधानी आहे.
एकंदरीत दिवाळीच्या दिवसांत शेतकर्यांच्या हातात खरीप हंगामाचे ‘दोन पैसे, हाती येतात ते माञ यावेळी दिसून येत नाही.
तरी देखिल सर्वञ दिवाळी चा फराळ, बहीण-भाचीस घरी आणणे,आकाशकंदील व फटाके तसेच नव्या कपड्यांची खरेदी करणे,नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या चाकरमानी गावास परतणे व जुन्या मिञांच्या भेटी-गाठी होणे यांसारख्या अनेक अनोख्या बाबी दिपावली घेऊन आली आहे.
शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले असले,दिवाळीच्या आधीच शेतकरी दिवाळखोर झालेले असले तरी त्यांच्या चेहर्यावर दिवाळी सणाचा आनंद व नवचैतन्य दिसून येणे हे ही थोडके नसावे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.