
Tej Police Times
‘हे मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की त्यांना भाजपाने तिकीटही दिलं नाही आणि आता शिवसेना विरुद्ध गरड ओकून पक्षात आपले महत्त्व वाढविण्याचा आटा-पिटा करीत आहेत’ अशी टीका प्रतापराव जाधव यांनी शेगावात बोलताना दिली. सरनाईकांच्या लेटर बॉम्ब बाबत बोलतांना ते म्हणले की, विरोधी पक्षाच्या मागे भाजपाने ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणेच्या चौकश्या लावून त्रासून सोडले आहे. यातून प्रताप सरनाईकांनी ते पात्र लिहिले असलयाचे खासदार जाधव यांनी सांगितले.
शिवसेनेनं ने पाठीत खंजीर खुपसले हे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. कारण निवडणुकीत सत्ता आणि जागा अर्ध्या-अर्ध्या असा फार्मुला ठरला होता. यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले नव्हते तर अमित शाह हे स्वतः मातोश्रीवर येऊन ही बोलणी झाली होती. असे असतांना विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने सेनेच्या उमेदवारांच्या विरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे करून पाठीत खंजीर खुपसले असल्याचं आरोप यावेळी त्यांनी केला. त्यांच्या या आरोपाला आता भाजप काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.