
Tej Police Times
पुणे दि.१३ :- कृषि विभागातर्फे ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शिवाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या तांदुळ महोत्सवाला विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी भेट दिली. महोत्सवातील प्रत्येक स्टॉलधारक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत ग्राहक होवून तांदुळ तसेच विविध शेती उत्पादनाची खरेदी केली.
कृषी विभागाच्या आवारात भरलेल्या महोत्सवाला भेट देत शेतकऱ्यांकडून शेती उत्पादनाची खरेदी करताना शेतकऱ्यांच्या अडचणी, उत्पादनाला मिळणारी बाजारपेठ आदी विषयांसह पुणे महानगरात शेतकरी ते ग्राहक थेट कायमस्वरूपी बाजारपेठ उभारण्याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून होत आहे. पुणे जिल्ह्यातील कृषि व आत्मा विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातुन पुण्यात तांदुळ महोत्सवाचे आयोजन करून शेतकऱ्यांना बाजारपेठ देण्याचा चांगला प्रयत्न आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीव्यवस्था कृषी विभागाच्या आवारात कायमस्वरूपी उभी करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तांदुळ महोत्सवातील स्टॉलमध्ये सेंदिय शेती, पर्यावरण प्रेमी, आरोग्य, तसेच नवीन गरजेप्रमाणे शेतकऱ्यांनी उत्पादने विक्रीसाठी आणली ही चांगली सुरूवात आहे. आजच्या स्टॉलधारक शेतकऱ्यांची एकत्रित वेबसाईटवर नोंदणी केली तर ग्राहकांना खरेदीही सुलभ होईल. तांदुळ महोत्सव शेतकऱ्यांच्या विकासाचे महत्त्वाचे पाऊस असल्याचा उल्लेखही श्रीमती गोऱ्हे यांनी केला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी तांदुळ महोत्सवाबाबत माहिती दिली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.