तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मुंबईत ‘या’ क्षुल्लक कारणासाठी तृतीयपंथीयांनी केली ३ महिन्याच्या मुलीची हत्या

0 63

हायलाइट्स:

  • धक्कादायक कारणातून मुंबईत चिमुकलीची हत्या
  • पैसे आणि साडी दिली नाही म्हणून ३ महिन्याच्या मुलीला संपवलं
  • घटनेनं शहरात खळबळ

मुंबई : शहरात ३ महिने वयाच्या मुलीच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात (Mumbai Murder Case) धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलगी झाल्यावर पैसे, नारळ आणि साडी न दिल्यामुळे रागावलेल्या तृतीयपंथीयांनी या मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. कफ परेड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कलम ३६३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतर खाडीच्या पाण्यात या मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या आई-वडिलांनी पैसे, नारळ आणि साडी या मागण्यांची पूर्तता न केल्याचा राग मनात ठेवून आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

‘देशात दहशत निर्माण करणाऱ्यांचं नामोनिशाण राहिलं नाही, हा इतिहास आहे’

पोलिसांनी याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक केली असून मुलीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कलम ३०२ सह खुनाशी संबंधित इतर कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. तसंच पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.