
Tej Police Times
संजय राऊत आज मुंबईत प्रसार माध्यमांसोबत बोलत होते. त्यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. नाना पटोलेंनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन विधान केले असेल, असं मला वाटत नाही. मुळात राजकारणात पाळत ठेवणे याचे खूप वेगळे अर्थ निघतात. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेची माहिती सरकारकडून घेतली जाते. मलाही सुरक्षा आहे, माझीही माहिती सरकारकडे असेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाः शिवसेनेचा माजी आमदार काँग्रेसच्या वाटेवर; पटोलेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
मोठ्या नेत्यांना सुरक्षा दिल्यानंतर कुठे जातात? काय करतात? एखाद्या ठिकाणी गेल्यामुळं धोका आहे का? याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. पटोले हे महाराष्ट्रातील अति महत्त्वाची व्यक्ती आहे. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं नानांनी या विषयाला फार गांभीर्याने घेऊ नये. काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.
वाचाः मोठी बातमी! नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब
काय म्हणाले होते पटोले?
‘मी स्वबळाची भाषा केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा उभी राहत आहे. माझ्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे,’ असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील कार्यक्रमात केले होते. ‘इतरांनी स्वबळाची भाषा केली, तर चालते. मग काँग्रेस पक्षालाही आपली पक्षसंघटना वाढविण्याचा हक्क आहे. मात्र, पोलिस खात्यातील एका विभागाकडून माझ्यावर पाळत ठेवण्यात येते. पोलिस याबाबतचा अहवाल सरकारच्या प्रमुखांना पाठवितात. तसेच, माझ्यावर पाळत ठेवली जाते,’ असे वक्तव्य पटोले यांनी केले होते.
वाचाः महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात बाराशे गुंड; करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी आखला अॅक्शन प्लान
Recover your password.
A password will be e-mailed to you.