
Tej Police Times
पाणी नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके जळून जात होती. त्यामुळे ते तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी पहाटे गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर गावकरी संतप्त झाले. पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे अधिकारी, संबंधित यंत्रणा ते थेट ऊर्जा मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतल्याचे संदेश कार्ले आणि रामदास भोर यांनी सांगितले.
मृत जाधव उच्चशिक्षित होते. नोकरी न करता त्यांनी शेतीचा पर्याय निवडला. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. जाधव मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे एकच शेवटचे वीज बिल थकीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्यावर हा मोठा आन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र, अद्याप तिकडे फिरकले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.