तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा; वर्सोवा-घाटकोपरवरून सुटणाऱ्या गाड्यांबाबत मोठा निर्णय

0 43

मुंबई : मुंबईतील पहिली व सर्वाधिक लोकप्रिय मेट्रो-१ आता पहाटे लवकर पकडता येणार आहे. ही रेल्वे आता वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही स्थानकांतून पहाटे ५.३०ला सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद असल्याने घाटकोपरहून आझादनगर, डीएननगरकडे मेट्रोने जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने घाटकोपरला येऊन अंधेरीकडे कामानिमित्त जाणारे सकाळी लवकरच गाडी पकडत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वर्सोवा भागातील अंधेरी पूर्व, साकीनाका भागात कामानिमित्त येणारे प्रवासीदेखील मेट्रोचा वापर अधिक प्रमाणात करीत आहेत. यामुळेच रेल्वे फेऱ्या वाढविण्याचा निर्णय ‘एमएमओपीएल’ने घेतला आहे.

बाजारात सर्वच भाज्यांचे दर कमी झाले; टोमॅटो आणि कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण

आतापर्यंत वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही ठिकाणांहून पहिली फेरी सकाळी ६.३० वाजता सुरू होत होती. मात्र आता ती पहाटे ५.३० वाजता असेल. तसेच याआधी वर्सोव्याहून अखेरची गाडी ११.१९ला होती. आता ती ११.२०ला असेल, तर घाटकोपरहून अखेरची गाडी आता ११.४४ ऐवजी ११.४५ वाजता सुटेल.

मेट्रो-१ने पहिली फेरी पहाटे ५.३० वाजता सोडण्याचा निर्णय घेतल्याने वर्सोवा ते घाटकोपर आणि घाटकोपर ते वर्सोवा या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी सात फेऱ्या अतिरिक्त झाल्या आहेत. यामुळे प्रत्येक मार्गावर सरासरी १,२०० ते १,४०० अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

मध्यरात्री गाडी सोडा

वर्सोवा आणि घाटकोपरहून मध्यरात्री गाडी सोडावी, जेणेकरून घाटकोपर-ठाणे व अंधेरी-बोरिवली लोकलने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी काही प्रवाशांनी ट्वीटद्वारे केली आहे. ‘परंतु मध्यरात्री ते पहाटे या रेल्वेमार्गाची व गाड्यांची विस्तृत देखभाल केली जाते. त्यामुळे मध्यरात्री विलंबाने गाडी सोडल्यास देखभालीचे व पर्यायाने दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बिघडेल’, असे ‘एमएमओपीएल’ने ट्वीटच्या उत्तरात म्हटले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.