
Tej Police Times
वाचाः मुंबै बँक घोटाळा प्रकरण: प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट
मुंबईतील हाजी अली दर्गा, जवाहर लाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे सी लिंक, मरीन ड्राइव्हचा क्वीन नेकलेस ही प्रसिद्ध ठिकाणे समुद्राच्या पोटात असतील. ही ठिकाणे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत, असं या अहवालात नमूद केलं आहे. तर, RMSI ने हे विश्लेषण IPCCच्या सहाव्या क्लायमेट अॅसेसमेन्ट रिपोर्टवरुन केलं आहे. फक्त मुंबईच नव्हे तर समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा फटका कोच्ची, मँगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमला देखील बसणार आहे.
वाचाः पुणे, औरंगाबादनंतर मुंबईतही रिक्षा चालक संपाच्या तयारीत; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पृथ्वी मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, उत्तरेकडील हिंद महासागरचा जलस्तर १८७४ -२००४ मध्ये प्रत्येक वर्षी १.०६ ते १.७५ मिलीमीटरच्या वेगाने वाढत आहे. १८७४ साल ते २००५ पर्यंत विचार केल्यास हिंद महासागर जवळपास एक फुट वर आला आहे. समुद्राचा जलस्तर वाढण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक मुख्य कारण आहे. तापमान वाढीमुळं येत्या काही काळात वादळांच्या संख्येतही वाढ होऊ शकते. पश्चिम किनारपट्टीवर गेल्या चार वर्षांपासून चक्रीवादळांच्या संख्येत ५२ टक्के वाढ झाली आहे. २०५० मध्ये तापमानात २ डिग्री सेल्सिअस वाढ झाली. तरी देखील चक्रीवादळ आणि वादळांच्या संख्येत तीन पटीने वाढ होईल.
वाचाः मोठी बातमी! प्लास्टिक वापरावरील निर्बंध शिथिल; सिंगल युज प्लास्टिकच्या ‘या’ वस्तू आता वापरता येणार
Recover your password.
A password will be e-mailed to you.