सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसानं राज्यात उसंत दिल्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी थांबला असला तरी कोल्हापूरात पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत. चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं तरी चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. रायगडमध्ये ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळं मोठी जिवितहानी झाली आहे. पावसानं उसंत दिल्यामुळं मदतकार्याला वेग आला आहे.
Live Update
सांगली: कृष्णा नदीची पाणी पातळी ५४ फुटांवर; शहरात अनेक भागात शिरलं पाणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही कोकणात;खेड, चिपळूणच्या नुकसानीची करणार पाहणी