तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

दोन लग्न करुनही सोलापुरच्या तरुणाला मिळाला दिलासा; न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

0 79

सोलापूरः एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींशी केलेला विवाह नवरदेवाला मोठा दिलासा मिळाला आहे. नवरदेव अतुल अवताडे यांच्याविरोधात अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसंच, राज्य महिला आयोगानेही नवरदेवाविरोधात कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अतुल अववताडेला मोठा दिलासा मिळाला आहे.

अतुल उत्तम अवताडे या महाळुंग परिसरातील गट नंबर २ मध्ये राहणाऱ्या तरुणाने शुक्रवारी (२ डिसेंबर) अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये रिंकी मिलिंद पाडगावकर आणि पिंकी मिलिंद पाडगावकर या दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला होता. या अनोख्या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर ही माहिती समोर आली. दरम्यान, माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबतची तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती.

दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना या दाम्पत्याची चौकशीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळं पोलीस तपासाचा मार्ग बंद झाला आहे. याविषयी अकलूज dysp शिवपूजे यांनी माहिती दिली आहे.

वाचाः अंगावर वाघासारखे पट्टे, डौलदार चाल; भावासारख्या मित्राला दोस्तांनी गिफ्ट केला रेडा, कारण काय?

काय आहे प्रकरण?

मुंबईतील कांदिवली येथून पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी आयटी इंजिनीयरिंग केले. नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून, त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून, त्या दोघी एकाच ताटात जेवतात. बालपणापासून एकत्र राहत असलेल्या दोन्ही बहिणींना शेवटपर्यंत सोबतच राहायचे आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली.

वाचाः मंदौस चक्रीवादळ धडकणार; ३ राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट

कायदा काय सांगतो?

नवरदेवाने जुळ्या बहिणीसोबत एकाच मांडवात विवाह केल्याने कलम ४९४ अंतर्गंत हे लग्न येत नाही. त्यांनी कायद्यातून पळवाट काढत हा विवाह केला आहे. तसंच, एकत्र लग्न झाल्याने पत्नीच्या विरोधाचा प्रश्नच नाही त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र, या लग्नाची कायदेशीर नोंद होत आहे. दुसरं लग्न हे वैध ठरत नाही.

वाचाः रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा होणार; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक एकदा पाहाच!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.