
Tej Police Times
दरम्यान, न्यायालयाने पोलिसांना या दाम्पत्याची चौकशीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळं पोलीस तपासाचा मार्ग बंद झाला आहे. याविषयी अकलूज dysp शिवपूजे यांनी माहिती दिली आहे.
वाचाः अंगावर वाघासारखे पट्टे, डौलदार चाल; भावासारख्या मित्राला दोस्तांनी गिफ्ट केला रेडा, कारण काय?
काय आहे प्रकरण?
मुंबईतील कांदिवली येथून पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी आयटी इंजिनीयरिंग केले. नवरदेव अतुल अवताडे हा माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील असून, त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पिंकी आणि रिंकीला एकमेकींबद्दल अतिशय ओढा असून, त्या दोघी एकाच ताटात जेवतात. बालपणापासून एकत्र राहत असलेल्या दोन्ही बहिणींना शेवटपर्यंत सोबतच राहायचे आहे. त्यामुळेच त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. अवताडे आणि पाडगावकर कुटुंबाने या विवाहास मान्यता दिली.
वाचाः मंदौस चक्रीवादळ धडकणार; ३ राज्यांना रेड अलर्ट, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर आस्मानी संकट
कायदा काय सांगतो?
नवरदेवाने जुळ्या बहिणीसोबत एकाच मांडवात विवाह केल्याने कलम ४९४ अंतर्गंत हे लग्न येत नाही. त्यांनी कायद्यातून पळवाट काढत हा विवाह केला आहे. तसंच, एकत्र लग्न झाल्याने पत्नीच्या विरोधाचा प्रश्नच नाही त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. जोपर्यंत पहिला जोडीदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र, या लग्नाची कायदेशीर नोंद होत आहे. दुसरं लग्न हे वैध ठरत नाही.
वाचाः रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा होणार; घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक एकदा पाहाच!
Recover your password.
A password will be e-mailed to you.