
Tej Police Times
भारत : ग्लोबल हॉटस्पॉट
देशाने गेल्या सात वर्षांत केलेली प्रगती ही भारतासारख्या देशाच्या ५० वर्षांतील प्रगतीएवढी असल्याचे जागतिक स्तरावरील मत आहे, याकडे अमिताभ कांत यांनी लक्ष वेधले. ४० कोटी नवी बँक खाती, ५५ हजार किलोमीटर लांबीची महामार्ग उभारणी, दोन अब्ज लशींच्या मात्रांचे वितरण, आयुष्मान भारत अंतर्गत ५० कोटी नागरिकांची नोंदणी अशा भारताच्या काही उपलब्धींचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
जी-२० कार्यक्रमांतर्गत नियोजन
– कार्यक्रमांचे वर्गीकरण करताना स्टार्टअप हा प्रथमच वेगळा गट
– महिलांद्वारे केल्या गेलेल्या विकासावर भर
– २१व्या शतकासाठी बहुस्तरीय व्यवस्थांची निर्मिती
– आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत स्थायी विकास
– विविध राज्यांत कार्यक्रम आयोजित करताना प्रत्येक राज्याच्या संस्कृती व परंपरांचे दर्शन
महाराष्ट्रातील उद्देश
– नागरिकांच्या जगण्याशी संबंधित गोष्टींची चर्चा केली जाईल
– डिजिटल प्रगतीचे प्रदर्शन केले जाईल
– जगाच्या दक्षिण गोलार्धाचा आवाज म्हणून भारताची प्रतिमा दाखवली जाईल
– महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल
– महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ, पोशाख, वस्त्रे यांची ओळख यानिमित्ताने करून दिली जाईल
Recover your password.
A password will be e-mailed to you.