Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चंद्रकांत पाटील यांना मावळ तालुक्यात धक्का; प्रचार केलेल्या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा सरपंच

17

पुणे (मावळ): राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचा धडका सुरू असताना यंदाच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने आपला गड राखण्यात यश मिळवले आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्याची मात्र चर्चा झाली. कारण मावळ तालुक्यात नऊ पैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचा स्वतः पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी प्रचार केला होता. मात्र त्या ग्रामपच्यातींवर राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. याचा फटका शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना देखील मोठा धक्का आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत बाकी देवले, इंदोरी, कुणेनामा, वरसोली, निगडे आणि सावळा येथे राष्ट्रवादीने आपला सरपंच बसवला आहे. या शिवाय बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचा येथे सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे मावळची निवडणूक विशेष महत्वाची ठरली आहे. त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे वर्चस्व वाढू लागल्याचे चित्र आता निर्माण होऊ लागले आहे.

क्लिक करा आणि वाचा- चार दिवस सासूचे…; सुनेकडून सासू पराभूत, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या पॅनलला धक्का

मावळ तालुक्यात भाजपच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीकडून सुरुंग लावला गेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचा मोठ्या फरकाने विजयी मिळवला होता. तसेच देहू नगरपालिकेवर देखील राष्ट्रवादीने बाजी मारली होती.

भाजपकडून या निवडणुकीसाठी आपली ताकत पणाला लावली होती. कारण अनेक आजी-माजी आमदारांनी येथे येऊन प्रचार केला होता.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंवर पहिल्यांदाच झाले भूखंड घोटाळ्याचे आरोप, आरोप फेटाळत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

मावळ तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनू लागला आहे. त्याची सुरुवात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून झाली. त्यामुळे मावळ तालुक्यात आता भाजपला लोक नाकारत असून राष्ट्रवादीला पसंती देत असल्याचे पहायला मिळत आहे. याबाबत आमदार सुनील शेळके यांनी सांगितले की, जनतेने ज्या लोकप्रतिनिधींनी कामे केली त्यांनाचा कौल दिला आहे, तसेच कुठल्याही भूलथापांना बळी न पडता हा निकाल दिला असून तीच आमची पावती असल्याचे शेळके म्हणाले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ग्रामपंचायतीतील पराभव सहनच झाला नाही, पराभूत उमेदवारांमध्ये राडा; एकास मारहाण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.