Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रात्रीचं जेवण झालं, शतपावलीसाठी बाहेर पडले; थोड्याच वेळात आली दु:खद बातमी; कुटुंबावर शोककळा

7

परभणी : रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथे घडली आहे. अशोक मुरलीधर गीराम असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून सेलू-परभणी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील अशोक गीराम हे रात्री जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी सेलू परभणी रस्त्यावर आले होते. रात्री ९च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मी कुत्र्यांच्या भांडणात पडत नाही; पुण्यात श्वान मालकच भिडले, पट्ट्यांनी हाणामारी
घटनेची माहिती मिळताच बाळासाहेब काजळे यांनी अपघातस्थळी भेट देवून मृतदेह रुग्णवाहिकेच्या मदतीने शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, मागील काही दिवसात सेलू-परभणी आणि सेलू-जिंतूर मार्गावर अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे दिसत आहे. परभणी सेलू रस्त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात आल्याने खड्डयाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे यामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.

वेगावर नियंत्रण राहत नसल्यामूळे अपघाताच्या घटना वाढत आहेत. तर सेलू-जिंतूर या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडूपे वाढली आहेत. त्यामुळे वळणावर समोरुन येणारे वाहन दिसत नाही. रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेली काटेरी झुडूपे तोडून टाकावीत आणि खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? फडणवीसांनी विधिमंडळातच स्पष्टपणे सांगून टाकलं

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.